खूप पूर्वी फोटोचे तंत्रज्ञान माहिती नव्हते तेव्हा कसलेले कलाकार मोठ्या लोकांची चित्रे काढत. मोठ्या लोकांचीच का, तर चित्रकला ही कला असण्याबरोबरच ते तंत्रज्ञान देखील होते, आणि आपली कला आणि तंत्रज्ञान यांचा केलेला योग्य वापर, आणि कौशल्य यासाठी त्यांना भरघोस मोबदला मिळे. हा मोबदला सामान्य माणूस कुठून देणार, म्हणून चित्रेही मोठ्यांचीच असत. रंग वगैरे तयार करावे लागायचे. आणि ते ही तंत्रज्ञान नसेल तेव्हा माणूस स्वतःला पाण्यात, किंवा प्रतिबिंब पडेल अशा ठिकाणी स्वतःचा चेहरा पाहत असेल तेच त्याचं स्वतःला पाहणं. पण त्याचं रंगरूप जतन मात्र होत नव्हतं. एखाद्याला दुसऱ्या माणसाला आठवायचं असेल तर कल्पनेतच आठवायचं, समोर चित्र किंवा फोटो असं काही नाही.
सोमवार, १० ऑगस्ट, २०२६
फोटो
गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६
कलागुण
प्रत्येक माणसामध्ये काहीतरी खास असतं कधीकधी ते ज्याचं त्याला माहिती असतं तर कधीकधी आपल्यामध्ये काय कलागुण आहेत हे आपलं आपल्यालाच माहिती नसतं. नशिबाने काहींना त्यांच्यामध्ये जे सर्वोत्तम असतं ते आयुष्यात खूप लहान वयातच गवसतं आणि मग ते त्यामध्ये जगात सर्वोत्तम बनतात. उदाहरणार्थ भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर. मग काही मधल्या फळीतले कलाकार असतात. खूप मोठ्या जनसमुदायासमोर कदाचित त्यांची ओळख नसते पण निदान त्यांच्या राज्यात त्यांचं खूप मोठं नाव असेल. काहींना आपल्या शहरातच ओळखतात तर काहींना केवळ आंतर शाळा-कॉलेज इत्यादींमध्येच चमकता येतं, पुढे सगळं मागे पडत जातं.
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६
दडपण
तुम्हाला कधी माणसांचं दडपण येतं का? म्हणजे आई समोर असेल तर मी अमुक पद्धतीने वागू शकत नाही पण मैत्रीण असेल तर वागू शकते प्रकारचं? किंवा घरचे आणि मित्र-मैत्रिणी हे फारच मोघम झालं. यामध्ये आपण वेगवेगळं वागतोच. पण घरच्यांमध्येही आईसमोर एक, बाबांसमोर एक, आजीआजोबांसोबत एक अशा प्रकारचं? किंवा आई - बाबांसमोर एक आणि भावंडासमोर एक? बऱ्याच लोकांचं उत्तर हो हेच असेल याची मला खात्री आहे. फार कमी जण समोर कोणीही येवो मी असा आहे आणि असाच वागेन किंवा हेच बोलेन अशा प्रकारचे असतात.
सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६
षड्रिपु-मत्सर
षड्रिपुंपैकी सहावा शत्रू हा मत्सर होय. हा अतिशय सुप्त असा रिपु आपल्यामध्ये दडलेला असतो हे आपलं आपल्यालाच माहिती नसते. सहज म्हणून आपली नकळत इतरांशी तुलना होत असते. जर ही तुलना मनाला त्रास करून घेणारी नसेल तर काहीच हरकत नाही. पण त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे का नाही, एखाद्याला आपणच आपल्यापेक्षा कमी लायक समजत असू आणि अशा व्यक्तीने आपल्यापेक्षा जास्त प्रगती केली की मत्सर जास्तच उफाळून येतो. मी जास्त लायक असून हे त्याला कसं मिळालं हा भाव आपलंच मन खात असतो. जोवर मत्सराला इतर रिपुंची साथ नाही तोवर तो फक्त आपलं मानसिक नुकसान करत असतो.
शुक्रवार, ३१ जुलै, २०२६
षड्रिपु-मद
माणसाला चांगल्या गोष्टींचा अभिमान असणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्या अभिमानाचा उन्माद झाला किंवा अहंकार झाला की तो मद असतो. माणसाकडे सत्ता असेल तर तो मदांध होणे खूप सोपे असते. एकदा एखाद्याला समजलं की काही ना काही कारणाने कोणी त्याचा विरोध करू शकत नाही की अशा माणसाला मद उत्पन्न होतो. मग इतरांशी वागताना सारासार विचार राहत नाही. ज्यांना गरज असेल त्यांची आणखी पिळवणूक करण्याची वृत्ती निर्माण होते.
गुरुवार, ३० जुलै, २०२६
षड्रिपु-मोह
मोह आणि लोभ हे एकच वाटू शकतात पण तसे नाही. मोह हा क्षणिक देखील असू शकतो पण लोभ हा स्वभावाचाच एक भाग बनून जातो. मोहासाठी एक क्षण पुरतो म्हणतात, पण तो एकच क्षण इतका भयानक असू शकतो की आयुष्यभराचं नुकसान करू शकतो. रस्त्यावर पडलेली मौल्यवान वस्तू उचलावी की उचलू नये, उचलली तर कोणाची आहे शोधून ज्याची त्याला परत द्यावी की आपल्याजवळच ठेवण्याचा मोह बाळगावा. यामध्ये मोह सारासार विवेकबुद्धीवर भारी पडू शकतो.
बुधवार, २९ जुलै, २०२६
षड्रिपु-लोभ
लोभ म्हणजे अतिरिक्त मिळण्याचा हव्यास. आपल्याला हवं तेवढं अर्जित करूनही जास्तीत जास्त कसं मिळेल याचाच सतत विचार. एकदा का माणूस लोभामध्ये पडला की कोणतीच गोष्ट त्याला पुरेशी वाटत नाही. आणि लोभाचा विशेष म्हणजे कष्टाने मिळवण्यापेक्षा माणूस अनैतिक मार्गाने कमावण्याचा प्रयत्न करतो. कारण माणसाचा लोभ इतका वाढलेला असतो की नैतिक मार्गाने एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस जितकं कमावू शकतो तितकं त्याला पुरेसंच पडत नाही. आणि एकदा कोणतीही गोष्ट मिळवण्याचे चुकीचे पण सोपे मार्ग ठाऊक झाले की माणसाचा लोभ अधिकाधिक वाढत जातो.
मंगळवार, २८ जुलै, २०२६
षड्रिपु-काम
षड्रिपूंपैकी आणखी एक रिपु म्हणजे काम. काम म्हणजे वासना. अनिवार शारीरिक इच्छा किंवा कोणताही गोष्टीचा हव्यास. क्रोधाप्रमाणेच अतिकाम देखील आरोग्याला हानी पोहोचवणारा रिपु आहे. काम अनावर झाला की त्यातूनही क्रोध निर्माण होतो. मग माणसाचे एकातून दोन शत्रू तयार होतात. असेच सहाही रिपु एकमेकांशी संलग्न आहेत. कामाला आवर न घालता येण्याचे प्रकार आणि त्यातून उद्भवणारे सामाजिक दुष्परिणाम आपण बघतच आहोत.
सोमवार, २७ जुलै, २०२६
षड्रिपु-क्रोध
षड्रिपुंपैकी एक असलेला क्रोध म्हणजेच राग! मनाचा राग फार वाईट, तो आपले इतरांसोबतचे संबंध तर बिघडवतोच शिवाय आपल्याही आरोग्यावर वाईट परिणाम करतो. आणि असं असूनही जाऊदेत या रंगाचे इतके तोटे असतात तर नको आपण रागवायला असं होत नाही. सगळ्या षड्रिपूंपैकी राग हा सर्वात जास्त सामान्यतः आढळणारा षड्रिपू आहे. रागाच्या भरात माणसे काय काय करून बसतील याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. भरपूर साधना, ध्यानधारणा करूनही रागावर नियंत्रण मिळवलंय असा माणूस सापडणे विरळाच.
रविवार, २६ जुलै, २०२६
मर्यादा
कोणत्याही गोष्टीला एखादी सीमा असते, आणि ती ओलांडू नये असा शिष्टाचार आहे. तर हे जे कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात करणे असते ती त्या गोष्टीची मर्यादा असते. खाण्याची मर्यादा, बोलण्याची मर्यादा, पोषाखातली मर्यादा, वागण्याची मर्यादा, नात्यांमध्ये अपेक्षित असलेली मर्यादा, एक सुसंकृत माणूस म्हणून अशा अनेक मर्यादा आपण पाळणे अपेक्षित असते. तेच एखादी व्यक्ती सुसंस्कृत नसेल तर त्याच्याकडून आपण मर्यादांची अपेक्षा करत नाही. उलट समजून घेतो की अमुक अपरिहार्यतेमुळे ही व्यक्ती अशीच वागेल, तर आपणच सावध रहावे हे बरे.
शनिवार, २५ जुलै, २०२६
उद्या
पूर्वी दुकानांवर पाटी असायची, अजूनही असते, 'आज रोख उद्या उधार'. उद्या कधी उगवतच नाही म्हणतात, पण आज रात्रीच्या बारानंतरच हा उद्या उगवणार असतो. आणि या उद्याच्या आशेवर आपण सगळे जगत असतो. रात्रीच्या गर्भातून पहाट उगवते म्हणतात. पण उद्याचं तसं नसतं. उद्या मी हे करेन उद्या मी ते करेन असं आपण खूप काय काय ठरवतो. उद्या हा शब्दच किती आशावादी आहे. आज एखादं काम नीट नाही झालं तर उद्या नक्की होईल असं वाटतं. एखादा मनुष्य वाईट परिस्थितीमधून जात असेल तर आज ना उद्या सगळं ठीक होईल असं म्हणतात. आज ना, म्हणजे जे आज ठीक नाही ते, उद्या नक्की ठीक होईल.
धक्का
गुरुवार, २३ जुलै, २०२६
चक्रव्यूह
चक्रव्यूह हा एक सापळा होता. त्यामध्ये एकदा योद्धा ते तोडण्यासाठी आत गेला की बाहेर येण्याचा मार्ग त्याला सापडत नसे कारण चक्रव्यूहाची रचना योद्धा आत गेल्यानंतरही गोल गोल फिरत राही. मग लक्षात ठेवणे अवघड असे की बाहेर पडण्याचा मार्ग कोणता. कधीकधी वाटतं आपलं आयुष्यदेखील असंच चक्रव्यूह आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याशी लढणारे योद्धे नसतात या चक्रव्युहामध्ये, पण आपण आपलं दैनंदिन जीवन जगणं हाच एक चक्रव्यूह आहे. कधीकधी एखाद्या प्रसंगातून असं वाटतं आपण कधी बाहेर पडणार. मग बऱ्याच प्रयत्नांनी आणि सहनशीलतेने आपण त्यातून बाहेर आलो की समजतं हा तर चक्रव्यूहाचा एक छोटासा भाग होता ज्यातून आपण बाहेर आलो, खरं चक्रव्यूह तर भेदलंच नाही अजून.
बुधवार, २२ जुलै, २०२६
वाचन
वाचनाचा छंद हल्ली लोप पावत चालला आहे असं म्हणतात. एक काळ असा होता की कोणतेही ज्ञान किंवा माहिती मिळवण्यासाठी वाचन हा एकमेव पर्याय असायचा. त्यामुळे एरवी वाचनाची अगदी आवड किंवा छंद नसलेली माणसेसुद्धा निदान रोजचे वर्तमानपत्र तरी वाचायचे. पण आता माहितीचे इतके स्रोत निर्माण झाले आहेत की एकदा शालेय, महाविद्यालयीन शिक्षण संपले की काही वाचावेच अशी सक्ती राहत नाही. काही अगदी अपरिहार्य गोष्टी, नोटिसा, फॉर्म्स, ऑफिसमध्ये कामाचे तपशील फक्त एवढ्याच गोष्टींवर त्यांचे वाचन थांबते.
मंगळवार, २१ जुलै, २०२६
भीती
सोमवार, २० जुलै, २०२६
पिच्छा
रविवार, १९ जुलै, २०२६
सख्खा
शनिवार, १८ जुलै, २०२६
वाढदिवस
शुक्रवार, १७ जुलै, २०२६
व्यक्त
गुरुवार, १६ जुलै, २०२६
अस्तित्व
बुधवार, १५ जुलै, २०२६
राहणी
मंगळवार, १४ जुलै, २०२६
माहेर
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"
सोमवार, १३ जुलै, २०२६
नियोजन
रविवार, १२ जुलै, २०२६
कौशल्य
प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत कुशल, निपुण असतो. काहीजण अनेक कलागुणांमध्ये कुशल असतात. कधीकधी काही विशिष्ट शिक्षण घेतल्याने काही कौशल्ये प्राप्त होतात, कधीकधी काही जणांमध्ये उपजत काही कौशल्ये असतात तर कधी शिक्षण आणि अभ्यासाने काही कौशल्ये आत्मसात करता येतात. पण जगात काही जण असेही असतात की त्यांच्यामध्ये काहीच कौशल्य नाही, किंवा काही असेही असतात की अतिशय साध्या वाटणाऱ्या एखाद्याला सहज जमतील अशा गोष्टीही त्यांना कौशल्य वाटतात.











