वाचनाचा छंद हल्ली लोप पावत चालला आहे असं म्हणतात. एक काळ असा होता की कोणतेही ज्ञान किंवा माहिती मिळवण्यासाठी वाचन हा एकमेव पर्याय असायचा. त्यामुळे एरवी वाचनाची अगदी आवड किंवा छंद नसलेली माणसेसुद्धा निदान रोजचे वर्तमानपत्र तरी वाचायचे. पण आता माहितीचे इतके स्रोत निर्माण झाले आहेत की एकदा शालेय, महाविद्यालयीन शिक्षण संपले की काही वाचावेच अशी सक्ती राहत नाही. काही अगदी अपरिहार्य गोष्टी, नोटिसा, फॉर्म्स, ऑफिसमध्ये कामाचे तपशील फक्त एवढ्याच गोष्टींवर त्यांचे वाचन थांबते.
बुधवार, २२ जुलै, २०२६
वाचन
मंगळवार, २१ जुलै, २०२६
भीती
सोमवार, २० जुलै, २०२६
पिच्छा
रविवार, १९ जुलै, २०२६
सख्खा
शनिवार, १८ जुलै, २०२६
वाढदिवस
शुक्रवार, १७ जुलै, २०२६
व्यक्त
गुरुवार, १६ जुलै, २०२६
अस्तित्व
बुधवार, १५ जुलै, २०२६
राहणी
मंगळवार, १४ जुलै, २०२६
माहेर
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"
सोमवार, १३ जुलै, २०२६
नियोजन
रविवार, १२ जुलै, २०२६
कौशल्य
प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत कुशल, निपुण असतो. काहीजण अनेक कलागुणांमध्ये कुशल असतात. कधीकधी काही विशिष्ट शिक्षण घेतल्याने काही कौशल्ये प्राप्त होतात, कधीकधी काही जणांमध्ये उपजत काही कौशल्ये असतात तर कधी शिक्षण आणि अभ्यासाने काही कौशल्ये आत्मसात करता येतात. पण जगात काही जण असेही असतात की त्यांच्यामध्ये काहीच कौशल्य नाही, किंवा काही असेही असतात की अतिशय साध्या वाटणाऱ्या एखाद्याला सहज जमतील अशा गोष्टीही त्यांना कौशल्य वाटतात.
शनिवार, ११ जुलै, २०२६
घर
शुक्रवार, १० जुलै, २०२६
गरज
आपल्या अवतीभवती अशीही माणसे असतील जे आपल्याबद्दल असं समजत असतील की यांचा मला काय उपयोग, पडली तर यांनाच माझी गरज पडेल. विशेषतः अनेक नातेवाईकांमध्ये एखाद्याची परिस्थिती थोडी निम्न असेल अशा वेळी तर इतर सगळे त्यांना गृहीतच धरतात. अमुक व्यक्ती वयस्कर आहे तर तिलाच माझी गरज लागणार, अमुक कमी आर्थिक स्तरातील असेल तरी त्यालाच माझी गरज पडेल. असे बऱ्याच जणांचे गैरसमज असतात. पण प्रत्येकच गरज फक्त पैशाने भागेल अशी नसते ना. म्हणून तर 'गरजवंताला अक्कल नसते' आणि 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' अशा म्हणींचा उगम झाला असावा.
विचार करा एखाद्या व्यक्तीचा आपल्याकडून अपमान झाला असेल, किंवा आपल्याला कधी कोणी खूप अद्वातद्वा बोललं असेल आणि उद्या आपल्याला त्यांचीच किंवा आपल्या अपमानकर्त्याला आपली गरज पडली तर नाक घासत जावेच लागणार. गरज अहंकाराला दूर ठेवण्याचे काम करते. आणि हे जगच असं बनलंय की कितीही पैसा असला तरी माणसाला माणसाची गरज पडतेच. जर कोणाला वाटत असेल माझ्याकडे खूप ऐश्वर्य आहे म्हणून मला कोणाची गरज नाही किंवा मी कोणाला कसंही वागवेन तर असे अहंकार उतरायला वेळ लागत नाही.
लहानपणी आपण गोष्ट शिकलेली असते ती अशी की जंगलाचा राजा सिंह एकदा झाडाखाली झोपलेला असतो आणि झंवर खेळत असलेला उंदीर त्याच्या अंगावर पडतो. सिंह झोप मोडली म्हणून खूप रागावतो, आणि त्या उंदराला मारून टाकण्याच्या तयारीमध्ये असतो. पण उंदीर गयावया करतो म्हणून सिंह त्याला सोडून देतो. काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो तेव्हा हाच उंदीर ते जाळं कुरतडून सिंहाची सुटका करतो. किती छान छान गोष्टी आपण ऐकलेल्या असतात पण प्रत्यक्ष आयुष्यात वागताना त्याचे मतितार्थ मात्र विसरून गेलेलो असतो.
आणि फक्त एखाद्याची गरज कधीतरी पडू शकते असा स्वार्थी विचार ठेवून सगळ्यांशी खोटं गोड वागण्यापेक्षा नेहमीच सगळ्यांशी हेवेदावे, कटुता किंवा काही पूर्वग्रह असतील ते सगळं बाजूला ठेवून चांगलं वागायला काय हरकत आहे.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
गुरुवार, ९ जुलै, २०२६
मनिम्याऊ
ती तिला हवं तेव्हा भटकायला जायची आणि तिला हवं तेव्हा घरी यायची. मनी मोठी होत गेली तशी तिचे निरागस निळसर डोळे करारी हिरव्या डोळ्यांमध्ये रूपांतरित झाले, पण लाडिकपणा मात्र तोच राहिला. मग एकदा असं समजलं की तिला पिल्ले होणार आहेत. तिला ४ पिल्ले झाली. पिल्ले झाली की मनी त्यांना सात जागी फिरवते. आम्ही मोजलं नाही कधी पण थोड्या थोड्या दिवसांनी मनी त्यांची जागा बदलायची खरी. अंगणात आंब्याचं झाड होतं, स्वतः त्यावर जाऊन बसायची आणि खाली पिल्लाना आवाज देत बसायची. झाडाच्या खोडाला पिलांना पुढच्या पायांच्या नखांना धार लावायला शिकवायची. पिल्ले आपलीच शेपटी पकडण्यासाठी गोल गोल फिरत खेळत ते बघायला खूप मौज वाटे.
आधी मनी उंदीर कुठे कधी खायची आम्हाला कधी समजलं नाही, पण पिलांसाठी दोनतीनदा तिने अर्धमेले उंदीर आणले होते. घरामध्ये त्याची घाण मात्र ठेवली नाही. तिच्या पिलांना शी करायला कुठे जायचं ते आम्ही बाहेर मातीमध्ये ठेवून शिकवायचो. तिला शेवग्याच्या शेंगा आणि उडदाचे तळलेले पापडही खूप आवडायचे. आम्ही शाकाहारी असल्याने आमच्याकडून मात्र तिला फक्त दूध-पोळीच मिळायची. मांसाहारासाठी ती स्वतःवरच पूर्णपणे अवलंबून होती. सकाळी आमचे दूधवाले आले की त्यांच्या मापट्याने तिच्या बशीत पण थोडं दूध ओतायचे.
तिच्या पिलांपैकी दोन थोडी मोठी झाल्यावर आम्ही सोडून आलो, दोन घरातच थांबली. त्यातीलही एक बोका होता तो नंतर घर सोडून निघून गेला. मनीची पिल्ले आल्यानंतर आम्ही पुन्हा पिलांशी खेळण्यात दंग होऊन गेलो. अशी मनीला बऱ्याचदा पिल्ले झाली. त्यातली बरीचशी घरात राहीली काही निघून गेली, बहुतेक करून बोके होते ते निघून गेले. काही आम्ही सोडून आलो. पिल्ले जास्त मोठी झाल्यावर सोडली तर कुठेही अगदी गाडीवर जाऊन त्यांना सोडून आलो असलो तरी ती काही दिवसांनी घरी परतत असत, त्याचं आम्हाला फार आश्चर्य वाटे.
एकदा एक पिल्लू खूपच सुंदर झालं होतं मनीला तिचं नाव आम्ही ऐश्वर्या ठेवलं होतं. आतपर्यंत जितक्या मांजरी झाल्या त्यात खरोखर ती खूपच देखणी होती. ती आजिबात घराबाहेरच पडत नसे, बरीच मोठी झाली तरी ती कधीच घराबाहेर गेली नाही. तिचा स्वभाव खूपच भेदरट होता. कुठून काही पडल्याचा आवाज आला तरी ती घाबरून मांडीवर येऊन बसत असे. हिचं कसं होणार अशी आम्हालाच चिंता लागून होती. एकदाच पहिल्यांदा ती घराबाहेर गेली आणि नंतर घरी पुन्हा कधी आलीच नाही. ती इतकी घाबरट होती की तिला कदाचित रस्ताही ओलांडता येत नसेल आणि मांजर घरी परततेच तेव्हा तिचं काही बरंवाईट झालं असेल असा आमचा आम्हीच समज करून घेतला आणि वाईट वाटून घेतलं.
तर मनीपासून सुरु झालेला हा प्रवास, मनी म्हातारी होऊन गेली तरी तिची वंशवेल आमच्याकडे चालूच राहीली होती. काही पिल्ले कधी घरातच दगावत तेव्हा त्यांना टेकडीवर जाऊन आम्ही पुरून येत असू. खूप वाईट वाटे. अनेकदा मन्यांची नवजात पिल्ले बोक्यांनी येऊन पळवली. खूप आश्चर्य वाटायचं. मग ते समजल्यावर तीही खबरदारी घेऊ लागलो. पण नंतर नंतर काही पिलांचं घरात असताना मरून जाणं, पिल्ले नवीन असताना मांजरीने घरात उंदरे आणणं त्याची घाण होणं, बोक्यांनी पिल्ले पळवून नेणं या गोष्टींचा त्रास होऊ लागला.
आमच्याकडे शेवटची मांजर राहिली होती तिला जरा जास्तच वर्षे पिल्ले झाली. म्हणजे आम्हाला वाटायचं ही म्हातारी झाली आहे, कधीही जाईल. पण काही दिवसांतच तिचं पोट फुगलेलं दिसायचं. खूप जास्त वयात पिल्ले झाल्याने की काय पण ती पहिलीच अशी मांजर निघाली जिने शेवटी शेवटी स्वतःचीच पिल्ले खाल्ली, बोक्यांनी तर नेलीच काही. नंतर नंतर ती खूप घाणेरडीही राहू लागली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती नेमकी चतुर्थी-एकादशीलाच घरात उंदरे-पक्षी मारून आणायची, ती पूर्ण न खाता त्यांचे अवशेष घरात सोडून द्यायची. एकदा देवघरातच मेलेला उंदीर ठेवून गेली होती.
या शेवटच्या अनुभवांनंतर मात्र आम्ही मांजरी पाळणं बंद केलं, तरी साधारण पंधरा ते वीस वर्षे आम्ही मांजरींच्या सहवासात राहीलो, त्याही आमचं कुटुंबच होत्या. त्यांच्या सहवासात ताणतणाव खरंच जाणवत नसतील पण तेव्हा तशी जाणीव नव्हती. आता फ्लॅट सिस्टीममुळे मांजर काय कोणताच प्राणी पाळणं मला शक्य वाटत नाही. आणि इतकी वर्षे त्यांच्या संगतीमध्ये राहून मन भरलं असेल कदाचित.
बुधवार, ८ जुलै, २०२६
मळभ
सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाच्या रिमझिम धारा, टपोरे थेंब, हिरवाई, इंद्रधनू, वाफाळणारा चहा - कॉफी, पावसाळी भटकंती सगळं सगळं आपल्याला हवंहवंसं असतं. पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो पण मळभ कोणालाच नको असतं. पाऊस म्हणजे सृजन पण मळभ म्हणजे नकारात्मकता. मळभ म्हणजे अंधार. मळभ म्हणजे नैराश्य. मळभ म्हणजे नकोशी गोष्ट. मन अंधारून आलं तरी त्याला मळभाची उपमा देतात.
मंगळवार, ७ जुलै, २०२६
सवंग
आपल्या वाट्याला सुख आलेलं असू देत वा दुःख, आपल्याला नेहमी ते कोणाबरोबर तरी वाटून घ्यायचं असतं. सुख आपल्याला भरपूर लोकांसोबत वाटून घेण्याची इच्छा असते, तर दुःख जवळच्या वाटणाऱ्या लोकांबरोबर आपण हलकं करू शकतो. कुठे कोडकौतुक झालं तरी कधी एकदा जगाला सांगतोय असं वाटतं. आणि जगाला सांगण्यासाठी हल्ली तर भरपूर व्यासपीठे उपलब्ध आहेत. व्यक्त होणं माणसासाठी किती महत्त्वाचं आहे.
सोमवार, ६ जुलै, २०२६
संकुचित
संकुचित मनोवृत्ती म्हणजे काय असते? डबक्यातले विचार वगैरे ठीकच पण रोजच्या आयुष्यात समजा मला कोणी काही अप्रिय बोललं, तर मी ते जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे का, आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे शक्य आहे का याचा विचार करण्यापेक्षा सर्वांत पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे मला कसे काय हे बोलतात. दुसरं एक उदाहरण म्हणजे चुका होतात, गैरसमज होतात पण ते दुसऱ्यांनी मुद्दामच केले अशी धारणा ठेवणे. एखाद्या व्यक्तीचा तसा वारंवार अनुभव आला तर गोष्ट वेगळी आहे, पण अशा व्यक्तीकडूनही नेहमीच मुद्दाम केलं जात नसेल ना.
रविवार, ५ जुलै, २०२६
रुबाब
आपल्याला आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यातली काही अशी असतात की मी म्हणजे कोणीतरी आहे. माझे सर्वांनी लाड करा. मला सर्वांनी महत्त्व द्या. माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. काही जण प्रसिद्ध व्यक्ती वगैरे झाल्यावर असे होऊ शकतात, तर काहीजण काहीही कुवत नसतानाही असे असतात. ज्यांना असं घेणं माहिती असतं त्यांना अवतीभवती माणसेही अशीच भेटतात जी त्यांना देतच जातात. स्वतःचे लाड, हट्ट पुरवून घेणं छान जमतं त्यांना. शिवाय केलेल्या छोटाशा गोष्टीचे श्रेय घेणेही छान जमते त्यांना.
















