गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

पाच वर्ष


पाच वर्षांपूर्वी याच दिवशी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. पाच वर्षांत खरंतर पन्नास पोस्टस देखील झाल्या नाहीयेत. म्हणायला पाच वर्ष फार मोठा आकडा वाटतोय पण असं वाटतं की काल-परवाच तर लिहायला सुरुवात केली मी. लिहिलं ते मनापासून लिहिलं. लिहिण्यापेक्षा वाचनच मला जास्त आवडतं, पण पूर्वी कधीतरी लिहिलेल्या ४-५ कविता डायरीत होत्या म्हणून ब्लॉगवर त्या टाकायला सुरुवात केली. नाहीतर निबंधलेखन सोडलं तर लिहिण्याशी तसा कधी संबंध आलाच नाही.

दिसामाजी काहीतरी ते लिहावे पण इथे दोन-दोन महिन्यानंतरही लिहिलं जात नाही माझ्याकडून. मध्ये दीड वर्षाचा मोठ्ठा ब्रेकही घेऊन झाला. तसं तर फार कोणी अपेक्षेने वाट पहावी असंही काही नाहीये इथे. इथे लिहिण्याचा पाच वर्षांमध्ये मला मिळालेला फायदा म्हणजे जेव्हाही मला अस्वस्थ वाटेल तेव्हा लिहिलं-वाचलं की बरं वाटायचं. बरेच नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले. खूप छान छान ब्लॉग्स वाचायला मिळाले. सगळ्यांकडून प्रोत्साहन मिळालं. आणि रुटीन सोडून काहीतरी केल्याचं समाधान मिळत गेलं. 

अजूनही खदखदत असतंच बरंच काही मनात, पण सगळ्याच गोष्टी नाही उतरवता येत हव्या तशा! तरीही जमेल तसं प्रामाणिक लिहिण्याचा प्रयत्न करायचाय. तुमची सगळ्यांची अशीच साथ असूद्यात… 





४ टिप्पण्या: